अर्धजागृत मनाला प्रोग्राम कसे करावे? | ध्येयपूर्तीचे ८ टप्पे | How to use Subconscious Mind in Marathi

भाग २: “अर्धजागृत मनाचा वापर कसा करावा? यशस्वी होण्याचे ८ प्रभावी टप्पे”

Author:
Prof. Kali C. S.
M.Sc., M.Ed., D.C.S.
50+ Years of Experience in Physics Teaching

  1.प्रस्तावना: ज्ञानापेक्षा आचरण महत्त्वाचे:

    भाग १ मध्ये आपण पाहिले की, अर्धजागृत मन म्हणजे नक्की काय आणि त्याची शक्ती किती अफाट आहे. पण खरी जादू तेव्हाच घडते, जेव्हा ही शक्ती आपण योग्य पद्धतीने आपल्या आयुष्यात उपयोगात आणतो.

   1.1. तुमच्या अंतर्मनाचा प्रोग्रामिंग कसे कराल?

    अर्धजागृत मन म्हणजे एक सुपीक जमीन आहे. तुम्ही त्यात जे पेराल, तेच उगवेल. जर तुम्ही नकारात्मक विचार पेरले तर काटे येतील आणि सकारात्मक विचार पेरले तर फुले फुलतील. हे मन वापरण्यासाठी खालील ८ टप्प्यांचा अवलंब करा.

 2. यशस्वी होण्यासाठी ८ सुवर्ण चरण (Steps):

   2.1. निस्वार्थ संकल्प करा: ( The Power of Intention):

          परिवर्तनाची पहिली पायरी म्हणजे ‘संकल्प’. तुमचा हेतू जितका मोठा, तितकी मनाची ताकद जास्त.

      तुमचे ध्येय फक्त स्वतःपुरते मर्यादित न ठेवता त्यात कुटुंब, समाज किंवा देशाचे कल्याण जोडा. जेव्हा हेतू मोठा असतो, तेव्हा निसर्ग तुम्हाला जास्त मदत करतो.

  2.2 स्पष्ट ध्येय निश्चित करा: (Goal Setting):

      तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्की काय हवे आहे?

    ध्येय कसे असावे?

  • भौतिक (Career, Wealth)
  • मानसिक (Peace, Confidence)
  • सामाजिक (Contribution)
  • आध्यात्मिक (Inner Growth)

    सर्व पैलूंचे संतुलन असलेले ध्येय निवडा.

   तुमचे ध्येय ‘बर्निंग डिझायर’ (तीव्र इच्छा) असले पाहिजे. अर्धजागृत मन फक्त तीव्र भावनेने दिलेल्या आदेशांना प्रतिसाद देते.

  2.3.  सकारात्मक मान्यता: (Belief System):

   ध्येय असलं, तरी त्याविरुद्ध नकारात्मक मान्यता असतील तर प्रगती थांबते.

   उदा.

  • “हे माझ्याने होणार नाही”
  • “माझ्यात क्षमता नाही”

  अशा विचारांना जाणीवपूर्वक बदलणे गरजेचे आहे.

  नवी मान्यता ठेवा:

      “काहीही झाले तरी मी ध्येय गाठणारच.”

    “मला हे शक्य आहे,”

    हा विश्वास मनात पक्का करा. मनात शंका असेल तर अर्धजागृत मन काम करत नाही.

  2.4.  भावनेची जोड द्या: (Emotional Connection):

      केवळ विचार करून चालत नाही, त्या विचारासोबत ‘भावना’ हवी. ध्येय साध्य झाल्यावर तुम्हाला जो आनंद होईल, तो आत्ताच अनुभवा. ध्येयाला भावना जोडल्याशिवाय अर्धजागृत मन सक्रिय होत नाही.

    म्हणून स्वतःला विचारा:

  • ध्येय साध्य झाल्यावर मला कसं वाटेल?
  • आनंद, अभिमान, समाधान कसं असेल?

 ही भावना जितकी तीव्र, तितका परिणाम अधिक प्रभावी.

  2.5. अल्पावस्थेत मनोचित्रण: (Visualization):

    रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्याबरोबर आपले मन ‘अल्फा’ (Alpha) स्थितीत असते. यावेळी आपले ध्येय पूर्ण झाल्याचे रंगीत चित्र डोळ्यांसमोर पहा. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा.

    मनोचित्रण कसे करावे?

  • शांत अवस्थेत बसा
  • डोळे बंद करा
  • स्वतःला ध्येय साध्य झालेलं जिवंत चित्रासारखं पहा
  • रंग, आवाज, भावना अनुभवा

     अर्धजागृत मन चित्रांमध्ये विचार करतं, शब्दांमध्ये नाही.

  2.6.  स्वयं सूचना (Affirmations): (Autosuggestion):

    यानंतर, स्वतःला सकारात्मक सूचना देणे आवश्यक आहे.

  उदा.:

  • “मला हवे ते मी नक्की मिळवणारच.”
  • “माझं मन आणि शरीर माझ्यासाठी काम करत आहे.”

   या सूचना:

  • दररोज
  • अल्फा अवस्थेत
  • भावनेने द्याव्यात

  स्वतःला वारंवार सांगा, “मी अत्यंत बुद्धिमान आहे,” “मी यशस्वी होत आहे.” या सूचना थेट अंतर्मनात जातात.

  2.7. उद्दीपकांचा वापर करा: (Catalysts):

     ध्येय साध्य करण्यासाठी काही उध्दिपक अत्यंत प्रभावी ठरतात:

  • मौन
  • उपवास
  • ध्यान
  • प्रार्थना
  • सकारात्मक विचार
  • अल्फा म्युझिक ऐकणे

      या सवयींमुळे अर्धजागृत मन धोरणबद्ध रीतीने सक्रिय होते आणि ध्येय प्राप्तीचा मार्ग सोपा होतो.

  2.8. संयम आणि श्रद्धा: (Patience):

       बी पेरल्यावर ते लगेच उगवत नाही. योग्य वेळ आल्यावर तुमचे अंतर्मन तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणेल, तोपर्यंत पूर्ण श्रद्धा ठेवा.

   त्याचप्रमाणे:

  • योग्य संकल्प
  • योग्य मनोचित्रण
  • सातत्यपूर्ण अभ्यास

     असल्यास परिणाम अटळ असतो.

       विश्वाची वेळ अचूक असते — आपल्याला फक्त धीर ठेवायचा असतो.

  3. अंतःकरण शुद्धी: अदृश्य पण निर्णायक घटक:

    सर्व प्रक्रियांचा पाया म्हणजे:

  • प्रेम
  • दया
  • क्षमा

       द्वेष, मत्सर आणि नकारात्मकता मनाची ऊर्जा अडवतात.
      शुद्ध अंतःकरण असलेले मनच खऱ्या अर्थाने शक्तिशाली असते.

  4. तुम्हीही ‘ते’ ४% लोक बनू शकता!

     जगातील केवळ ४% लोकांनीच या शक्तीचा वापर करून इतिहास घडवला आहे. मग ते संत ज्ञानेश्वर असोत, स्वामी विवेकानंद असोत किंवा आधुनिक काळातील अब्दुल कलाम आणि सचिन तेंडुलकर.

  4.1. कर्मवीर भाऊराव पाटील:

       “शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन” हा विश्वास त्यांनी अंतर्मनातून कृतीत आणला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अर्धजागृत मनाच्या शक्तीचा आणि वरील चरणांचा वापर करून ‘रयत शिक्षण संस्थेचे’ एका वटवृक्षात कसे रूपांतर केले, यावर ही छोटी टिपण:

 कर्मवीर भाऊराव पाटील: अर्धजागृत मनाच्या शक्तीचा जिवंत अविष्कार:

     १९१९ मध्ये साताऱ्यातील ‘काले‘ या गावी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेचे छोटेसे रोपटे लावले. आज त्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे, यामागे त्यांच्या अंतर्मनाची प्रचंड शक्ती आणि नियोजित कृती होती:

4.1.1. ध्येय आणि संकल्प:

  कर्मवीरांचा संकल्प केवळ स्वतःसाठी नव्हता, तर तो ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असा होता. ग्रामीण भागातील गरिबांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हे त्यांचे स्पष्ट आणि ‘बर्निंग डिझायर’ असलेले ध्येय होते.

 4.1.2. अढळ विश्वास (Belief System):

    “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे त्यांनी केवळ तोंडाने म्हटले नाही, तर आपल्या अर्धजागृत मनात पक्के रुजवले. जेव्हा लोक त्यांच्या या कल्पनेला हसायचे, तेव्हा त्यांच्या अंतर्मनातील ठाम विश्वासामुळेच ते डगमगले नाहीत.

 4.1.3.  मनोचित्रण आणि भावना (Visualization):

    कर्मवीरांनी गरिबांची मुले शिकून मोठी होत आहेत, हे चित्र आपल्या अंतर्मनात सतत जिवंत ठेवले होते. ‘कमवा आणि शिका’ या योजनेमागे त्यांची हीच दूरदृष्टी आणि भावनिक जोड होती.

  4.1.4. सातत्यपूर्ण प्रयत्न (Efforts and Patience):

   बी पेरल्यावर त्याचे वटवृक्ष होण्यासाठी अनेक दशके लागतात. कर्मवीरांनी अर्धजागृत मनाच्या सहाय्याने प्रतिकूल परिस्थितीतही (दुष्काळ, पैशांची कमतरता) संयम ठेवला. त्यांनी स्वतःच्या पत्नीचे दागिने विकले, पण आपल्या ध्येयापासून ते मागे हटले नाहीत.

  4.1.5. अंतःकरण शुद्धी:

        त्यांच्या कामात कमालीची पारदर्शकता, गरिबांबद्दल दया आणि समाजासाठी त्याग होता. त्यांच्या शुद्ध अंतःकरणामुळेच विश्वाच्या शक्तीने त्यांना वेळोवेळी मदत केली.

         १९१९ मध्ये लावलेले ते एक छोटे रोपटे आज हजारो शाखांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हे ‘अर्धजागृत मनाचा’ वापर करून शून्य उभे करण्याचे जगातील सर्वोत्तम उदाहरण आहेत.

  5. निष्कर्ष: अल्लादीनचा चिराग तुमच्याच हातात आहे:

  थोडक्यात:

  • अर्धजागृत मन म्हणजे तुमच्यातील सर्वात मोठी शक्ती
  • योग्य पद्धतीने वापरल्यास जीवन बदलू शकते
  • विचार, भावना आणि सातत्य हेच यशाचे सूत्र आहे

अल्लादीनचा चिराग बाहेर नाही तो तुमच्याच आत आहे.

     तुमच्या अंतर्मनाची शक्ती ओळखा आणि आजपासूनच तुमच्या यशाचा प्रवास सुरू करा!

6. Video support:

हे व्हिडिओ नक्की पहा  (Reference Video)

ध्येय मनोचित्रण Archives - Physics Prana